डाव ओळखा आणि शहाणे व्हा!

 डाव ओळखा आणि शहाणे व्हा!

              ----------------------------------------------------------

आम्ही बदमाश म्हणतो ते उगीच नाही. विमानतळाला नाव पनवेल, उरणचं द्यायला हवं होतं म्हणे. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कोपरला. नावाची मागणी झाली तेव्हा शेलघर, कोपरच्या भांडणात उलवे नोड दिले. कोपर शाळेचे नाव बदलून स्वतःच्या नावापुढे उलवे नोड लिहिले. 

असा खोटारडा मास्तर कधीच झाला नाही. रामशेठ हा कलंक आहे समाजाला लागलेला.

म्हणे, नवी मुंबई विमानतळाऐवजी पनवेल, उरण द्यायला हवे होते. मग विमानतळाचा ठेका घेण्यापूर्वी का नाही मागणी केली? हेका सुचलं नाही? तेव्हा टेंडर प्रिय होतं का?

आधी रायगडचे खासदार म्हणून जिल्हा सांभाळतो, असे दाखवू लागले. खासदारकी गेल्यावर जिल्ह्यातील लोकांना स्पष्ट सांगितले, आता मी फक्त पनवेल, उरण पुरतं पाहणार!

मध्यंतरी, ज्या ग्रामपंचायत हद्दीत टेंडर तिकडे झोकून देत मूठभर लोकांना विकत घेतले. खानावळे --- हिरानंदानी प्रोजेक्ट, न्हावे, गव्हाण -अटल सेतू, वहाळ- पारगाव, आणि इतर गावे - विमानतळ, ओवळे-कुंडेवहाळ- पाडेघरं, जेएसडब्लू, उरण परिसर - जेएनपीटी, खारघर - सिडको टेंडर, 

जिकडे टेंडर तिकडे ही मेंढरं... बाप बेटे सारखेच... आमदार प्रशांत ठाकुरही तेच करतात. जिकडे रिडेव्हलपमेंट तिकडे आमदार आणि टोळी. महापालिका फक्त टेंडर आणि बांधकामाकरिता ओरबाडून खाल्ली आहे. त्यासाठी बिनकामाचे, बिनकण्याचे लोकं पोसली जातात. ज्यांना गल्लीत कुणी विचारत नाहीत, असे बांडगुळ उगीच उसने हसू आणत मिरवतात. कर्तृत्व शून्य लोकं काल परवा पर्यंत यांना शिव्या हासडत होते. आज त्यांना गोजाळण्याची नामुष्की आली आहे. वाईट आहे यांचा कर्मभोग.

भेकडांना कुटुंबासहित पोसणं हा सुद्धा अपमृत्य आहे. मानखंडना आहे. पण, 'खोट्याच्या कपाळी गोटा', तशी यांची अवस्था झाली आहे, बुवा.

यांनी बोलायचं आणि पेपरवाल्यांनी छापायचं... लोकं मूर्ख बनतात. यांना जरा वरील उदाहरणे विचारली आणि बातमी टाकली तर समाजाचा उद्धार होईल अन्यथा त्यांच्या कळपात राहून काहीही निष्पन्न होणार नाही. लबाड आहेत. खोटे आहेत. त्यांचे उदात्तीकरण करणं हा आत्मघातकीपणा आहे.

त्यांच्या वाईट कृत्याला हजार वाटा आहेत. सत्याचा अवशेष त्यांच्याकडे शोधून सापडणार नाही. लोकनेते दिबा पाटील यांचे सर्वात मोठे नुकसान रामशेठ ठाकूर यांनीच केले आहे. त्यांच्याच घरातील एक प्यादा फोडून पगारावर ठेवून दिबा पाटलांचा पत्रव्यवहार आणि संपूर्ण माहिती यांना कशी मिळत होती?

आमदार प्रशांत ठाकूर म्हणतात, शेकाप आणि विरोधी पक्षाने बाळासाहेब ठाकरेंचे नाव उचलून धरले होते. त्यातील अर्धे पदाधिकारी आपल्याकडे घेतले आहेत, त्यांना पक्षातून बाहेर काढण्याची हिंमत दाखवा आणि मग विरोधी पक्षावर बोला. राजीनामा देणार होते त्याचे काय झाले?

तुम्ही म्हणता नाव दिले नाही. तुमचे आप्पा म्हणतात पनवेल, उरण नाव दिले पाहिजे होते. ते पुढे म्हणतात, नवी मुबंई हे नाव द्यायला नको होते. याचा अर्थ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव दिलं आहे असे तुमचे जन्मदाते सांगतात. त्यांच्यावर जर विश्वास ठेवून तुम्ही राजीनामा न देता १५०० रुपयात यु ट्यूबबर अक्कल पाजळून मनोरंजन करुन घेत असाल तर तुम्हाला कुणीही माफ करू शकत नाही.

तुमचा राजीनामा हाच नवी मुंबई विमानतळ नामकरणाचा एक अजेंठा राबवू. शिवाय केंद्र व राज्य सरकारला ओरडून सांगायला खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा तयार आहेत. इथले लोकं पेटून उठतील. आता कुणी थांबणार नाहीत. तुमच्या फसव्या पक्ष प्रवेशाला कुणी भुलणार नाहीत. ज्या दिवशी तुम्ही भाजपा सोडाल त्या दिवशी रामबाग उद्धवस्त झालेली असेल आणि तुम्ही डोसाबाई ट्रस्टपासून आदिवासी, मोसारा ते सिडको भूखंडात कारागृहात असाल कलियुगातील राक्षसरुपी अंधांचे त्रिदेव!

तूर्तास इतकंच. बाकी नंतर हिशेब घेऊ. तोपर्यंत शासकीय अधिकाऱ्यांना मिठ्या मारत राहा... त्यांना पैसे छापायचे आहेत. इथल्या जनतेला लुटायचं आहे. त्यासाठी ते हात मिळवणी करतात गुंडांच्या म्होरक्याशी. बाकी काही त्यात तुमचा सन्मान नाही. खासगीत सगळे अधिकारी आम्हाला हे वाक्य सांगतात. तेव्हा त्यांचा नरडा दाबावासा वाटतो. त्यामुळे ते अडकले की आमची लेखणी फाडून खाते, तुमच्यावर जसे तुटून पडतो तसं त्यांचाही हिशेब पूर्ण करतो. तो करावाच लागेल. पनवेल कुणासाठीही कुरण होऊ देणार नाही. मग राजकीय नेते असोत की शासकीय अधिकारी. भाड्यांनो, तुम्हीही ध्यानात ठेवा. इथे ज्वालारस खदखदत आहे. त्याचा स्फोट कधीही होऊ शकतो. मग अधिकारी काय आणि राजकीय नेते, गुंड काय? कुणाचीही भिडभाड ठेवली जाणार नाही.

- कांतीलाल कडू



Featured Post

डाव ओळखा आणि शहाणे व्हा!

  डाव ओळखा आणि शहाणे व्हा!               ---------------------------------------------------------- आम्ही बदमाश म्हणतो ते उगीच नाही. विमानतळ...