संघर्ष समितीने पुन्हा लावला कारवाईसाठी ' धोशा'
..............................
पनवेल: गुटखा विक्रेत्यांनाकडून हफ्ते वसुलीवर गुजराण करणाऱ्या पोलिसांपासून तथाकथितांचे अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईने धाबे दणाणले आहेत. 'मी नाही त्यातली, अन कडी लावा आतली' , असे काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकंही गुटखा विक्रीच्या हफ्तेखोरीवर व्हाईट कॉलरने जगण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या ब्लँकमेलींग व्यवसायालाही सुरुंग लागणार आहे.
पनवेलसह सर्व शहरे आणि ग्रामीण भागात तसेच ढाब्यांवर असलेल्या टपऱ्या, शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात शासनाने बंदी आणलेला पानमसाला, गुटखा आणि इतर तत्सम तंबाखूजन्य पदार्थांची मोठ्या प्रमाणात काळ्याबाजाराने विक्री होत आहे.
याबाबत पनवेल संघर्ष समितीने गेल्या आठवड्यात अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या सोबत बैठक घेवून पनवेलसह रायगडात करावाई करण्याची मागणी केली होती.
त्यानंतर अतिरिक्त आयुक्त शिवाजी देशमुख, सहाय्यक आयुक्त लक्ष्मण दराडे यांच्याकडे कारवाईसाठी तगादा लावला होता. रायगड प्रशासनाकडे अपुरे कर्मचारी बळ असल्याने पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी देसाई यांना विनंती करून त्यांच्याकडील 18 कर्मचारी आणि अधिकारी रायगडच्या सात जणांच्या सोबतीला देवून पनवेल, विंचुबे, नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर आदी ठिकाणी सात पथकाने छापे टाकून साथ हजाराचा गुटखा जप्त केला.
त्यांच्या कारवाईनंतर गुटखा विक्रेत्यांना ब्लँकमेलींग करणाऱ्या तथाकथितांनी टोपी फिरवली आहे. नियमित हफ्ते घेणारे पोलिसही हात वर करून आमचा काही संबंध नाही असे सांगू लागले आहेत.
एका गुटखा विक्रेत्यांनी मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तो म्हणतो, आमच्याकडून हफ्ते घेतलेल्यांनी त्यांच्या मुलांच्या डोक्यावर हात ठेवून सांगावे, की आमचा गुटखा विक्रीशी काहीही संबंध नाही. अनेकांना मागतील तसे हफ्ते द्यावे लागतात, अशी खळबळजनक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
गुटखामुक्तीसाठी अन्न व औषध प्रशासनाने हत्यार उपसले असून टपरीधारकांना धडकी भरली आहे. तर कारवाईत नियमितता हवी, अशी मागणी दराडे यांच्याकडे कडू यांनी केली आहे.
गुटखा विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारताच हफ्तेखोऱ्यांनाही भरली धडकी!
Featured Post
डाव ओळखा आणि शहाणे व्हा!
डाव ओळखा आणि शहाणे व्हा! ---------------------------------------------------------- आम्ही बदमाश म्हणतो ते उगीच नाही. विमानतळ...
-
डाव ओळखा आणि शहाणे व्हा! ---------------------------------------------------------- आम्ही बदमाश म्हणतो ते उगीच नाही. विमानतळ...
-
वैचारिक वारसा लोप पावला! - कांतीलाल कडू अलिबागचे झुंजार शेतकरी नेते आणि चरीच्या शेतकरी लढ्याचे प्रणेते नारायण नागू पाटील यांची नात, रायगडच...
-
‘ही’ तर लोकनेते दि. बा. पाटलांची वैचारिक हत्या! - कांतीलाल कडू विशेष संपादकीय राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे यांनी हत्या केल...
-
पानसरेंनी ‘विवेक’ जपला! विशेष संपादकीय - कांतीलाल कडू थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील प्रमुख गावगुंड आणि बैलगाडा शर्यतीतील सोशल...